भारत संचार निगमने मानमानी पद्धतीने खोदलेल्या चारीमुळे एखाद्याच्या जिवितास धोका निर्माण झाल्यास येथील पुढाऱ्यांना जाग येणार का ? असा संतप्त सवाल जनतेतुन विचारला जात आहे .
भारत संचार लिमिटेड परंडा हे आपघाताची वाट बघत आहे का ? अशा प्रश्ना मात्र आता सर्वांना पडला आहे
देशभक्त न्युज - परंडा प्रतिनिधी (फारूक शेख )
भारत संचार निगम निमिटेड परंडा यांनी बाजारसामितीच्या पूढे चार दिवस झाले केबल टाकण्यासाठी तीन फूट खोल चारी मेन रोडला खोदली आसून ती चारी खोदली असुन ती चारी सध्या सर्वांसाठी धोक्याची घंटा ठरत असल्या मुळे या गंभीर प्रश्नी बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता संबंधित विभागाने याबद्दल असे म्हटले की , भारत संचार निगम निमेटेड यांनी आमच्या कार्यालयकडे कसला ही लेखी पत्र व्यवहार केला नसुन त्यांनी ही चारी मागनी पद्धतीने खोदलेली असून आंम्ही आमच्या कार्यालया मार्फत परंडा पोलिस स्टेशनला प्रत्र देवून कळविले आहे
पुढे त्यांनी असेही सांगितले की , आम्ही दिलेल्या पत्रामध्ये असेही म्हटले आहे की , त्या चारी मूळे आपघात झाला तर सार्वजानिक बांधकाम विभाग परंडा त्या प्रकारास जबाबदार राहणार नाही . ती चारी करमाळा बार्शी मेनरोड वर आहे. तिथे व्यापार लाईन व शाळकरी आणि रहदारी जास्त आसून संध्याकाळी जर एखादी फोरव्हीलर गाडी जर चारीमध्ये गेली तर मोठा आपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी ही चारी तात्काळ बूजून घेण्यात यावी अशी तामुक्यातिल नागरिकांतु मोठी मागणी पुढे येत आहे . असे असतानाही मात्र भारत संचार लिमिटेड परंडा हे आपघाताची वाट बघत आहे का ? अशा प्रश्ना मात्र आता सर्वांना पडला आहे .
